Tuesday, July 8, 2014

माहितीये! आम्ही पाहिलं ना टीव्ही वर…

सगळं लाइव्ह दाखवण्याऱ्या आजच्या मिडीयाने आपल्या आयुष्यातला एक छान आनंद हिरावून घेतलाय… तो म्हणजे किस्से सांगण्याचा!

जेव्हा टीव्ही नव्हता तेव्हा वारीला जाऊन आलेली माणसं त्यांच्या अनुभवाचं वर्णन किती रंगवून रंगवून करत असतील. त्यात प्रत्येकाचे अनुभव वेगळे, त्याकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगळी त्यामुळे प्रत्येकाची वारी वेगळी… आता कोणी सांगायला लागलं तर? लोक म्हणतील, "माहितीये! आम्ही पाहिलं ना टीव्ही वर…"

तीच कथा बिबट्या किंवा कोल्हा पाहिलेल्या माणसाची… बिबट्या किती जोरात पळाला हे जर कोणी सांगायला लागलं तर आयुष्यात कुत्रा सुद्धा जवळून न पाहिलेला माणूस तज्ञाच्या थाटात त्याला सांगू शकतो की "माहितीये! आम्ही पाहिलं ना टीव्ही वर!"

आणि अशीच गोष्ट पावसामुळे अडकून पडलेल्या माणसाची, काजव्यांनी भरलेली दरी पाहिलेल्या माणसाची, अपघात घडतांना पाहिलेल्या माणसाची आणि समुद्रात अचानक उंच उंच लाटा आल्या तेव्हाच चुकून मरीन ड्राईव्ह वर असणाऱ्या माणसाची…
बातमी सांगण्याला काहीच आक्षेप नाही. पण हल्ली बातमी सांगणारे त्याचा किस्सा करून सगळ्या जगाला सांगून टाकतात. मग आयुष्यात कधीतरीच असा भन्नाट अनुभव येणाऱ्या माणसांनी कुठे जायचं बरं???

Monday, June 30, 2014

Cloud of Creativity

It just occurred to me that it must be extremely difficult to paint something that is truly abstract. I mean, how do you visualize something that doesn't exist? Is the process similar to writing? Or similar to invention?
Even in writing it is very difficult to write in a non structured way. It is like trying to drown when you know the art of swimming. It is impossible. Doing something, anything out of structure is so very difficult. I always knew it in writing. But it is for the first time that I am appreciating the beauty of it in a painting.
Where does it come from? Or for that matter, where did this realization come from? Does everything come from the same place? If yes, is that 'some' place inside my mind? Or is it outside somewhere? The "Cloud of Creativity"???

Sunday, April 20, 2014

Why are there no girls on the grounds???

I know it is not very easy to confront issues that need a lot of thinking.... I also know that many people avoid discussions just because their brains are too lazy to do that exercise. But what I don't know so far and can not understand is why do people tend to avoid issues that are so blunt that they are literally staring in their faces?
Let me tell you about one such issue... This is one issue about which I have tried to discuss with many friends with very little response and that too with minuscule enthusiasm... And the issue is such that I really can't not look at it. I see a lot of photographs and videos like everybody does. Many on them have children playing on the ground. These videos are rural as well as urban. But there is one thing common in them. They only show 'boys' playing on the ground.



There are boys playing cricket.
There are boys flying kites.
There are boys swimming.
There are boys running just for the fun of it.
There are boys playing football.
There are boys doing N number of things...



But there are no girls.
I have hardly ever seen a photo or a video where there are girls playing freely on the ground. And in all the travel I have done so far, I have hardly ever seen adolescent girls playing on the ground just like that. And the least I can say is that the number of girls found playing on the ground against boys is pathetic.
My question is, why is it so? Why are there no girls on the ground? What or who is responsible for it?
Do the girls don't feel like playing? Is that really possible? Or is the social pressure so strong that the thought of playing doesn't even cross their minds? Is it fair that the girls never get a chance of being fit? Or of experiencing the joy of playing? Or of knowing how it feels to run so much that you are out of your breath?
How would these girls know there are more beautiful things in life that shiny clothes? How would they know there are more beautiful feelings than being useful? How would they ever have the deeper understanding of life?
And the most important question... Why doesn't anybody feel that this issue needs to be taken up?

Wednesday, August 7, 2013

फॅशन

रिझल्ट लागला, पाऊस आला, वाढदिवस झाला, त्यानिमित्ताने मान्सून सेलमधे भरपूर शॉपिंग केलं, लायसन्स मिळालं आणि खूप वाट बघून शेवटी एकदाचं कॉलेज सुरु झालं...
कॉलेजचा पहिला दिवस. जान्हवी कॉलेजला जाण्यासाठी खूप लौकर उठली होती. खूप आवरायचं होतं तिला. केस धुवायचे होते, ब्लो ड्राय करुन सेट करायचे होते, मेकअप करायचा होता, नुकतेच घेतलेले लेटेस्ट फॅशनचे कपडे घालून तयार व्हायचं होतं... आणि तिथेच सगळी गडबड होती.
तिने मैत्रिणींबरोबर शॉपिंग करतांना अनेक वेगवेगळे कपडे घेतले होते. त्यात हॉल्टर नेकचा टॉप, लो वेस्ट जीन्स, ए-लाईन फ्रॉक, रॅप अराऊंड स्कर्ट असं खूप काय काय होतं. आणि त्यांच्या सगळया ग्रूपने ठरवलं होतं की पहिल्या दिवशी रॅप अराऊंड स्कर्ट घालायचा.
जान्हवीने तो घालून पाहिला. पण तिला काही तो आवडला नाही. जरा वारा आला की त्याची मोकळी बाजू फडफडत होती. कॉलेजमधे जर जोरात वारा आला तर? जान्हवीला काही ती आयडिया फारशी आवडली नाही. पण सगळया मैत्रिणींचं तर ठरलेलं होतं... आता काय करणार?
शेवटी जान्हवीने मनाविरुध्द तो स्कर्ट घातला, आणि 'रिस्क नको' असं म्हणून त्याच्या फडफडणाऱ् या बाजूला अर्ध्यातून पिन लाऊन टाकली. पण मनातून तिला तो प्रकार काही आवडलेला नव्हता त्यामुळे तिला त्या स्कर्टमधे वावरतांना अजिबात कम्फर्टेबल वाटत नव्हतं. कट्टयावर बसतांना, चालतांना ती सारखी कॉन्शस होत होती. चालतांनाही ती स्कर्टची मोकळी बाजू सतत हाताने सारखी करत होती.
कॉलेजचा पहिलाच दिवस असल्याने कोणीच लेक्चरला बसलं नाही. दिवसभर सगळयाजणी भटकल्या, धमाल केली. दुपारनंतर सगळयाजणी फ्रेश व्हायला वॉशरुममधे गेलेल्या असतांना जान्हवीला तिच्या दोन मैत्रिणींचं बोलणं ऐकू आलं.
''तू बघितलंस का? जान्हवीला हा स्कर्ट सूट नाही करत.''
''हो गं. बहुतेक ती खूप बारीक आहे ना त्यामुळे असेल.''
हे बोलणं ऐकून जान्हवी मनात खूप चडफडली. मुळात तिला तो स्कर्ट घालायचा नसतांना सगळयांचं ठरलंय म्हणून तिने तो घातलेला होता आणि एवढं करुन त्याच मुली तो तिला कसा चांगला दिसत नाही याबद्दल आपसात चर्चा करत होत्या. जान्हवीचा संताप झाला आणि तिने त्या स्कर्टवर कायमची फुली मारली. घरी येऊन ती तो स्कर्ट हातात घेऊन खूप वेळ रड रड रडली...
तिच्याकडे एक बॅग भरुन असे फुली मारलेले कपडे होते. हे कपडे तिला सूट होत नाहीत म्हणून तिने बाजूला ठेवलेले होते. आणि त्यात सगळया प्रकारचे कपडे होते. जीन्स होत्या, स्कर्ट्स होते, फ्रॉक्स होते, पंजाबी ड्रेस होते, लेगिंग्ज आणि कुर्ती होत्या. हे कपाट पाहिलं की आपल्याला एकूणात काहीच चांगलं दिसत नाही याबद्दल जान्हवीची खात्री पटायची. ती बॅग हे तिच्या आयुष्यातल्या एका कायमच्या फ्रस्ट्रेशनचं कारण होती. कधीही खोली आवरतांना तिला ती बॅग दिसली तरी तिला मनापासून वाईट वाटायचं. कारण ते सगळे कपडे तिला घेतांना खरं आवडलेले होते आणि ते तिच्या बहुतेक सगळया मैत्रिणींना चांगलेही दिसत होते. ''मग मलाच का नाही ते चांगले दिसत?'' या विचाराने तिच्या डोक्याचा अनेक वेळा भुगा झालेला होता.
आणि ज्यार्थी आपल्याला काहीच चांगलं दिसत दिसत नाही त्याअर्थी आपण मुळातच चांगले दिसत नाही याबद्दलही तिची खात्री पटलेली होती. आणि आपण दिसायला चांगले नाही या कल्पनेने तिला भयंकर वाईट वाटायचं. कॉलेजमधल्या इतर मुली कशा छान दिसायच्या, छान रहायच्या आणि जान्हवी मात्र त्यांच्यात कायमच अवघडलेली असायची.
आणि एकदा आपण चांगलेच दिसत नाही म्हटल्यावर काय, तिच्या सगळया कॉलेज लाईफचा मूडच बदलून गेला. तिने फार लोकांमधे जाणं टाळायला सुरुवात केली, फॅशन्स ट्राय करणं सोडून दिलं, तिने सरसकट पंजाबी सूट घालायला सुरुवात केली कारण त्याच्या ओढणीने तिला हवं तसं अंग झाकून घेता यायचं. शिवाय तिला पंजाबी सूट घातल्यावर अनेकदा लोकांनी सांगितलं होतं की ते तिला चांगले दिसतात. पंजाबी सूट चांगले दिसतात म्हणून तिला आवडायचे. पण ते फार काकूबाई दिसतात असंही वाटायचं. तिला खरं तर इतर मुलींसारखी फॅशन करायची फार इच्छा होती. पण 'चांगलं दिसत नाही ना...' असं स्वत:ला सांगून तिने ते कायमच टाळलं होतं.
तिचं कॉलेज संपलं. आणि तिने पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतली. तिचं आयुष्य असंच सरळ रेषेत चालू राहिलं असतं; पण मधेच तिचा दादा प्रेमात पडला...
विदिशाशी तिची खूपच गट्टी जमली. इतकी की त्या दोघी त्याला टाळून कॉफी प्यायला भेटायला लागल्या. असंच एकदा तिच्या वाढदिवसाला विदिशा तिला म्हणाली,
''चल आपण तुला जीन्स घेऊ.''
जान्हवी म्हणाली, ''नको गं. मी घालत नाही जीन्स.''
''का???''
''अगं मला चांगली नाही दिसत.''
''असं कोणी सांगितलं तुला?''
''सगळेच म्हणतात असं. आणि आपलं आपल्याला कळतं ना...''
''हे बघ... सगळे म्हणतात याला काहीच अर्थ नाही. कोण सगळे? त्यांचा संबंध काय? तुला काय चांगलं दिसतं यावर त्यांनी कशाला काही मत द्यावं?''
''हो पण माझं मला तर कळतंच ना...''
''काही कळत नाही तुला! बावळट! म्हणे जीन्स चांगली दिसत नाही... तू माझ्याबरोबर दुकानात चल, तिथे मी सांगते ते सगळं ट्राय कर. आणि तरीही तुला ते आवडलं नाही, तर तू म्हणशील ते मी तुला घेऊन देईन.''
असं म्हणून विदिशा तिला जवळ जवळ ओढतच दुकानात घेऊन गेली. विदिशाच्या एव्हाना लक्षात आलं होतं की जान्हवीला अंगप्रदर्शन करणाऱ् या कपडयांमधे कम्फर्टेबल वाटत नाही. त्यामुळे तिने जान्हवीसाठी हाय वेस्ट जीन्स, थोडे ढिल्या फॅशनचे शर्ट्स आणि टॉप्स असं शोधून काढलं.
ते कपडे बघून जान्हवी म्हणाली, ''मला खरं म्हणजे असे कपडे आवडतात. पण चांगले दिसत नाहीत ना म्हणून''
तिचं वाक्य अर्ध्यातच तोडून विदिशा म्हणाली, ''चांगले दिसतात की नाही ते अजून ठरायचं आहे. तू एकदा ते कपडे घाल तर खरं. मग बघू आपण.''
तिच्या आग्रहामुळे जान्हवीने ते कपडे घेतले. मग एकदा विदिशाबरोबरच बाहेर जातांना घालून पाहिले. ते फारच कम्फर्टेबल होते. इतके, की आपण जीन्स घातली आहे हे थोडया वेळाने जान्हवीच्या लक्षातसुध्दा राहिलं नाही. मग तिची थोडी भीड चेपली आणि तिने एरवीही जीन्स घालायला सुरुवात केली.
एका शनिवारी ती हिंमत करुन कॉलेजला जीन्स घालून गेली. तिथे तिच्याकडे बघून तिची कॉलेजमधली मैत्रिण म्हणाली,
''अरे तुझे जीन्स कितनी सूट करती है। इतने दिन क्यूं नहीं पहनती थी? अब सिर्फ अच्छासा हेअरकट करवाले।''
जान्हवीला कळेना आपली मैत्रिण खरंच बोलते आहे का चेष्टा करते आहे. पण इतरही 3-4 मैत्रिणींनी तिला तेच सांगितल्यावर तिचा विश्वास बसला.
तेव्हा तिला विदिशा सांगत होती ते खऱ् या अर्थाने पटलं. विदिशा तिला सांगत होती की जे कपडे तुला कम्फर्टेबल वाटतात ते घाल. फॅशनचा विचार करु नको. कारण तुला प्रत्येक फॅशनचे कपडे चांगले दिसतीलच असं नाही, पण तुला कम्फर्टेबल वाटणारा प्रत्येक कपडा तुला चांगलाच दिसेल.

 तिचं म्हणणं अक्षरश: खरं होतं... आज जान्हवी मनापासून खूष होती... ''बरं झालं आपल्याला विदिशा भेटली आणि आपण तिचं म्हणणं ऐकलं. नाहीतर आपले कॉलेजचे सगळे दिवस काहीच मजा न करता आपण अक्षरश: वाया घालवले असते. पण आता तसं होणार नाही. पण आता तसं होणार नाही. कारण कम्फर्ट आणि कॉन्फिडन्स हे दोन्ही शब्द एकाच अक्षराने सुरु होतात हे आपल्याला नीटच कळलंय.''

Sunday, May 5, 2013

Past Rohtang Pass


I had always known about Rohtang pass... One of the most popular tourist destinations near Manali in the Himalayas in Northern India. And I had sort become used to the beauty of the Shivalik ranges of Himalayas as I travelled from Shimla to Manali through Jalori Jot, probably the greenest pass one can ever find at around 13,000 feet.
The entire terrain was so subtly and quietly beautiful that I had started taking it's serene beauty fro granted on my 4th day in the Himalayas.
We left Manali early morning to avoid the traffic jam on the way to Rohtang pass. Yet, it was around 6AM when we reached Rohtang pass. I was wondering what the hype was about Rohtang apart from the fact that it was the first pass with snow capped peaks. The driver was telling us about the horse rides, treks and other tourist activities in Rohtang pass, when we crossed the pass and went to the other side of the mountain...



That was something I never knew about... Could never know about... It was something that one can not tell another human being about... It is something the words can never describe...
For it was not changing a valley... It was changing my entire world.
It was as if I had left the civilization that I knew about behind. It was something so magnificent and yet the barrenness of the terrain so terrifying...
I don't think a photo or a video can even give an idea of the sensation that first footstep in the Dhavaladhar ranges evokes in you.
A sensation of serenity, sanctity, aloneness without being lonely, something that brought me back to myself.
I knew Himachal was called the "Land of the Gods". In this moment I knew why...
It is not meant for mortal humans.

Thursday, December 27, 2012

भारतीय (संस्कृती)???

फार दिवसांपासून भारतीय संस्कृती बद्दल लिहायचा विचार करत होते. पण इतके दिवस असं वाटत होतं की विषय इतका निरर्थक आहे की त्याबद्दल लिहिण्यात आपली शक्ती आणि बुद्धी कशाला वाया घालवायची? पण आता मात्र असं वाटतय की ज्या भारतीय संस्कृतीच्या नावाने त्याचे स्वयंघोषित संरक्षक गले काढत असतात त्यांना इतकी तरी जाणीव करून दिली पाहिजे की ते एक अत्यंत शिळी आणि नि:सत्त्व गोष्ट विकायचा प्रयत्न करतायत. याबरोबरच मी outdated पण म्हणणार होते. पण माझ्या लक्षात आलं की ज्यांना श्रुतीस्मृतीपुराणोक्त असण्यातच मोठेपणा वाटतो त्यांना uptodate असण्याच काय कौतुक असणार आणि outdated असण्याचं तरी काय सोयरसुतक असणार?


भारतीय समाज आणि संस्कृती वरचा माझा राग अत्यंत वैयक्तिक आहे. मला माझ्या क्षमता पूर्णपणे वापरता येत नाहीत. माझं आयुष्य आनंदाने जगता येत नाही. अनेक छोट्या छोट्या आनंददायक अनुभवांपासून दूर रहावं लागत. आणि या सगळ्याचं कारण एकच... भारतीय समाज आणि संस्कृती माझ्या आयुष्यात मध्ये मध्ये करतात. मी काही रोज चंद्राची सफर करण्याची स्वप्नं बघत नाही. पण कुठेतरी फिरायला गेलेलं असतांना पाण्याचा डोह दिसतो. बरोबरची पुरुष मंडळी सहज कपडे काढून पाण्यात उतरतात. मनसोक्त पोहोतात. आणि मी? मलाही तितकंच चांगलं पोहोता येत. मलाही तितकच उकडत असतं. पण मी मात्र पोहायचं नाही. अगदी फारच पोहायचं असेल तर सगळे कपडे अंगावर तसेच ठेऊन पोहायचं. आणि तरीही आजूबाजूच्या गावातली रिकामटेकडी मुलं आणि माणसं गावात सर्कस आल्यासारखे भोवती गोळा होणार. काहीतरी कॉमेंट करणार. १०० पैकी ९८ वेळा ती कॉमेंट अश्लील असणार... मग माझा आणि माझ्या बरोबरच्यन्चा मूड जाणार. काहीतरी भांडणं होणार. मग तसेच ओलेगच्च कपडे अंगावर वागवत गाडीत बसायचं. आणि हे सगळ टाळायच असेल तर पाण्यात फक्त पाय बुडवायचे... तेवढं पाउलभरच जगायचं...

संध्याकाळी बाहेर पडल्यावर गावातली मैदानं दिसतात. सगळीकडे मुलं (मुलगे) खेळत असतात. मलाही आवडतं मोकळ्या हवेत खेळायला. पण मी नाही खेळायचं. कारण यांच्या थोर भारतीय संस्कृतीत नारीने व्यायाम करण्यासाठी काही सिस्टीम नाहीच आहे. बरोबर खेळायला कोणी मुली कधी येत नाहीत. कारण त्यांच्या भारतीय आई वडिलांनी त्यांच्यावर दिवेलागणीच्या आत घरात येण्याचे संस्कार केलेले असतात. त्या मुली अत्यंत मरतुकड्या राहिल्या तरी चालेल, पण त्यांनी संस्कृतीचं संवर्धन केलं पाहिजे.

रात्रीच्या आकाशाखाली एकटीने पहुडण्याचा विचारसुद्धा मी करू शकत नाही. एकटीने सायकल वर आरामात फिरायला जावसं वाटण्यात काय चूक आहे? पण असं जरा कुठे गावाबाहेर गेलं की कोणीतरी काहीतरी करून माझा आनंद नासवणार हे नक्की असत.

अशा खूप लहान लहान गोष्टी असतात ज्यामुळे आपल आयुष्य समृद्ध होत असत. पण या गोष्टी करायला, निखळ आनंदाने जगायला तुमच्या भारतीय संस्कृतीत कुठलीच जागा नाहीये. सगळीकडे परंपरेचा काच आणि संस्कृतीची कटकट आहेच. मला कधी कधी खरोखर असं वाटत की आपल्याकडे भरपूर बुद्धीमत्ता असूनही कुठल्यातरी खऱ्या अर्थाने सुसंस्कृत देशात जायचा विचार आपण केला नाही ही चूक झाली की काय?

लठ्ठ पगाराच्या नोकरीचा मोह मला कधीच पडणार नाही. पण मनसोक्त जगण्याच्या आनंदाच्या मोहापायी मात्र मी हा देश सोडून जाण्याचा अनेक वेळा विचार करते. आणि मला खात्री आहे, की आज ज्या ब्रेन ड्रेन बद्दल इतका तावातावाने लिहिला आणि बोललं जात त्यामागे बऱ्याच मोठ्या प्रमाणात ही मोकळ्या आणि समृद्ध जगण्याची आस असणार आहे.

Tuesday, February 9, 2010

Hi

Hi,

This is my first blog. I am publishing this just to see how it looks!!! :-